चंद्रपूर : देशात नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व यशाचा आनंद चंद्रपूर शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक नागपूर रोड परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, पक्षाचे झेंडे फडकावून आणि लाडू वाटप करत जल्लोष केला.या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना डॉ. अशोक जीवतोडे (प्रदेश उपाध्यक्ष, भाजप ओबीसी मोर्चा) यांनी सांगितले की, देशाच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये पक्षाला मिळालेली आघाडी ही जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे.या यशामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे प्रभावी नेतृत्व व प्रचार हे महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी संबंधित राज्यांतील जनतेचे तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.डॉ. जीवतोडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या जल्लोषात माजी नगरसेवक देवानंद वाढई, आनंद चकीनारपवार, दिलीप कार्लेवार, संदीप देशपांडे, अजय ढिमोले, प्रकाश घाटे, रवि जोगी, मंगेश अहिरकर, आबाजी बाविस्कर, सचिन दिघाडे, मेहता यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













