मुंबई :*ठाकरे बंधूचे एकदाचे काय ते ठरलं पण बेस्ट ठरलं.*
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि मनसे यांची युती होणार असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचं पहिलं पाऊल असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
बेस्ट पतपेढीची येत्या १८ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीच्या निमित्ताने ठाकरे सेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे कर्मचाी सेना एकत्र लढणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.
महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत असून गेल्या काही दिवसांपासून मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. अशातच या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतील असा विश्वास महाराष्ट्रातील जनतेचा आहे. अशातच बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी एक पत्रक जारी करून चर्चांना उधाण आणलंय. कारण त्यात ठाकरे ब्रँड असा उल्लेख असून बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीच्या निवडणुकांची तारीखच जाहीर केली आहे.
बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास जी सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष मा संदीप देशपांडे यांच्यामध्ये या युतीविषयी मागील काही दिवसापासून युतीबाबत चर्चा सुरु होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्टमधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे.













