शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या दादर येथील निवासस्थानी शिवतीर्थ येथे पोहचले.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. शिवसेना मंत्री आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीचे कारण अद्याप समजले नाही. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी राजकीय वर्तुळात मात्र अनेक चर्चा रंगल्या आहेत.
मंत्री उद्या सामंत यांना या भेटीचे कारण विचारले असता ते म्हणाले की, सकाळी काही कामासाठी मी या भागात आलो होतो. त्यामुळे राज ठाकरे यांना फोन केला. मी गप्पा मारण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यानांही वेळ होता. त्यांनी होकार दिला.
राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यावर अनेक विषय कळतात. विकासाबाबत माहिती मिळते. त्यामुळे ही अराजकीय भेट होती. परंतु तुमच्या मनात जी शंका आहे. ती कोणतीही चर्चा झाली नाही. अतिशय चांगली चर्चा झाली आणि दरम्यान चहा घेतला. खिचडी खाल्ली आणि निघालो.”
पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली का.?
या प्रश्नावर उदय सामंत म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असती तर मी जाहीरपणे सांगितले असते. त्यासाठी पत्रकार परिषद घेतली असती. आजची भेट ही अराजकीय होती. आता मी एकनाथ शिंदे याना भेटण्यासाठी जाणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल की राज ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा एकनाथ शिंदे याना सांगणार? परंतु तसे काही नाही. माझ्या आणि राज ठाकरे यांच्या भेटीत कोणतीही राजकीय खिचडी झाली नाही.













