शिरूरमध्ये हळदी समारंभात वादातून हाणामारी – तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरूर | प्रतिनिधी – रमेश बनसोडे
शिरूर तालुक्यातील शांतीनगर परिसरात हळदी समारंभात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीच्या प्रकारामुळे तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा क्रमांक 261/2025 नुसार आरोपींवर BNS कलम 115(2), 118(1), 352, 351(2)(3), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना दि. 18 एप्रिल 2025 रोजी रात्री 8.30 वाजता शांतीनगर, शिरूर येथे घडली.
फिर्यादी दिक्षा मोहन राखपसरे (वय 30, व्यवसाय मजुरी, रा. शांतीनगर, शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचा मुलगा श्रेयश व आरोपी प्रकाश विठ्ठल लोंढे यांच्यात हळदी समारंभाच्या वेळी किरकोळ वाद झाला होता. त्यासंबंधी जाब विचारण्यासाठी फिर्यादी व तिची सासू लिलाबाई लक्ष्मण राखपसरे या प्रकाश लोंढे यांच्या घरी गेल्या असता, तेथील गंगा विठ्ठल लोंढे, प्रकाश विठ्ठल लोंढे आणि कैलास विठ्ठल लोंढे यांनी दोघींनाही हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केली.
तसेच, प्रकाश लोंढे याने दिक्षा यांचा मुलगा श्रेयश याला काठीने मारहाण करत शिवीगाळ केली व “तुम्हाला सोडणार नाही, मारून टाकीन” अशी जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
या प्रकरणी पो.ह.वा. शिंदे (क्र. 2463) यांनी गुन्हा नोंदवला असून, तपास पो.ह.वा. खेडकर (क्र. 3328) हे करत आहेत.
या घटनेमुळे शांतीनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील तपास पोलीस करत आहेत.












