(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड तहसील अंतर्गत संजय गांधी निराधार योजना विभागाकडून लाभार्थींना मिळणाऱ्या अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनुदानाची रक्कम नियमितपणे प्रति महिन्याला मिळत नसल्याने दिव्यांग बांधवांना उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. या समस्येच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांनी गंगाखेड तहसीलदारांना दिनांक 17 रोजी निवेदन सादर केले.
निवेदनामध्ये, संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम प्रति महिन्याच्या 5 तारखेपर्यंत वितरित करण्यात यावी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना प्रति महिना 1,500 ते 4,000 रुपयांपर्यंत अनुदान वाढवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर दिव्यांग बांधवांच्या सह्या असून, प्रमुख स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये हरिश्चंद्र पोले, विलास भालेराव, मोहन केंद्रे, जगन्नाथ टूले, रामभाऊ निळे, सुनीता मुंडे, श्रुती कातकडे, रेखा जाधव, विठ्ठल मुसळे, रमेश केंद्रे, पांडुरंग कातकडे, राजेभाऊ चव्हाण, संजय राठोड, तुकाराम नागरगोजे, अशोक रुपनर, गोविंद भोसले, नागनाथ मुसळे, अशोक टोम्पे, देविदास कांबळे, मंगल भिसे, मोहन फड, दिगंबर भोसले आदींचा समावेश आहे.
दिव्यांग बांधवांनी सादर केलेल्या निवेदनामुळे शासन आणि प्रशासनाने तातडीने योग्य पावले उचलून या समस्येचे निराकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.













