
शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे ता. ११ पुणे -सोलापूर महामार्गावर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून पुणे -सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील पाटस ,वरवंड, खडकी या तीन ठिकाणी भुयारी मार्ग करणेसाठी केंद्र सरकारकडून मंजूर मिळाली असून यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सतत पाठपुरावा करत असल्याने सुप्रियाताई सुळे यांना अपेक्षित यश आले आहे. तसेच संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग हा पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग असून या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांची प्रचंड मोठी वाहतूक होत असते आणि आजूबाजूच्या गावालगत असणाऱ्या नागरिकांना रस्ता ओलांडणे मुश्किल होत असून याबाबत दौंड तालुक्यातील पाटस येथे संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर पुणे सोलापूर महामार्ग जंक्शन , वरवंड येथे पालखी विसावा रोड ,महामार्ग जंक्शन खडकी येथे पारवडी खडकी रोड मार्ग करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे केली होती,याची दखल घेत सुप्रियाताई सुळे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा लेखी पत्र व्यवहार केला होता .या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर अपेक्षित यश आले असून केंद्र सरकारने या तीन भुयारी मार्ग करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम पूर्ण होऊन नागरिकांना प्रवास करणे सोपे जाणार आहे .या मंजुरीसाठी सुप्रिया सुळे यांनी गडकरी साहेबांचे आभार मानले











