बीड :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतावर लोककल्याणकारी स्वराज्या चे निशान असावे ,अशी शहाजीराजांची व मासाहेब जिजाऊ यांची इच्छा होती, त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा निर्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला, आदिलशाही , निजामशाही, कुतुबशाही ,मोगलांना ,नमवत बहुतांशी प्रांतावर शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा वीसतार केला ,सर्व प्रांतातील प्रजा सुखी व निर्भयपणे जीवन जगावे म्हणून त्या प्रांतात कार्यकुशल सरदार नेमले ,स्वराज्य रक्षणासाठी नवीन किल्ले बांधून त्यावर उत्तम बंदोबस्त ठेवला, अशा निर्भय महामानवाला राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, यांच्या जयंतीनिमित्त परळी शहरांमध्ये सामूहिक विवाह सोहळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन परळी नाथ प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले ,सायंकाळी ७ वाजता फटाक्यांच्या आतीषबाजीत भव्य दिव्य मिरवणूक परळी शहरातून गल्लोगल्लीतून काढण्यात आल्या ,