गोंडपिपरी – (सुरज माडूरवार)
गोंडपिपरी येथील न्यायालयाच्या मागे तलावात मित्रांसोबत अंघोळीला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा तलावात बुडाल्याची घटना दि(७) मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली .सदर घटना ही मंगळवारी रात्री आठ वाजता दरम्यान उघडकीस आली .माहिती मिळताच गावकरी आणि ठाणेदार रमेश हत्तिगोटे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बुडालेल्या बालकांची शोधमोहीम हाती घेतली होती.मात्र रात्र झाल्याने मृतदेह सापडू शकले नाही बुधवारी दोन्ही बालकांचे मृतदेह सापडले.
गौरव विलास ठाकूर वय १४ वर्ष ,शौर्य भास्कर पिंपळशेंडे वय १५ वर्ष रा.दोघेही गोंडपिंपरी शिवाजी चौक अशी तलावात बुडालेल्या मुलांची नावे आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असल्याने व उन्हाचा पारा जास्त असल्याने मंगळवारी सकाळी बारा वाजता दरम्यान वार्डातीलच 11 मुले फिरायसाठी गेल्यानंतर त्यांना तलावात पोहण्याचां मोह आवरला नाही.चिमुकले पोहण्यासाठी तलावात उतरले पाण्यात व्हाल्लि्बॉल खेडत होते. तेथील 9 मुले घरी परतले तर दोघे बुडाले.मात्र भीतीपोटी ईतर 9 चिमुकल्यांनी ही घटना घरच्यांना सांगितली नाही.बेपत्ता मुलांच्या घरच्यांनी शोधाशोध केली असता माहिती काढली असता पोहायला गेलेले समजले.कुटुंबीयांनी पोलिसांना सोबतीला घेत तलावाकडे रात्री ८ वाजता दरम्यान धाव घेतली.तलावाच्या बाहेर कपडे आढळले कपड्यांची ओडख पटल्याने एकच खळबळ उडाली होती.ठाणेदार हत्तिगोटे यांनी मृतदेह शोधण्यासाठी मच्छिमारांचे सहकार्य घेतले पाण्याची पातळी खोल असल्याने मृतदेह सापडले नाही.मात्र बुधवारी सकाळी ६ वाजता दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगत वर आली. मृतदेह तलावाबाहेर काढून उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेमुळे गोंडपिपरीत शोककडा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व पोलीस उपविभागीय अधिकारी शिवलाल भगत यांनी घटास्थळी भेट देत संवेदना व्यक्त केल्या.
सामूहिक अंत्यसंस्कार .
वढोली येथील अंधारी नदीवर बुधवारी दुपारी १ वाजता दोन्ही मृतक चीमुकल्यांचे अंत्यसंस्कार पार पडले.
तर घटना टळली असती….
चंद्रपूर आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले ते काम करत असताना महसूल विभागाने मुरूम उत्खननाची परवानगी कंपनीला तलावातून काढण्यासाठी दिली. परंतु दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेत अवैद्य मोठ्या प्रमाणात मुरमाचे उत्खनन झाले. परिणामी मोठे वीस फूट तीस फूट असे खड्डे त्या ठिकाणी पडले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला.
शौर्यने दाखवले शौर्य पण जीव गमावला…
बॉल खेडताना गौरव ठाकूर खोल पाण्यात बुडाला. त्याला वाचवायला संकल तयार करून शौर्य हा त्याचा हात पकडून बाहेर काढताना त्याचाही तोल गेला व दोघेही बुडाले. आणि बाकी बचावले व भीती पोटी इतर मुलं पळ काढत थरकापत घरी येऊन कुणालाही न सांगता झोपले आणि मुलं घरी आले नाही म्हणून त्याचा शोध घेतला असता एका मुलाने सर्व सांगितलं पुढे घटना उघडकीस आली