बीड (विशाल वाघमारे ) :- युवा ग्राम विकास मंडळ कैज व ऊसतोड कामगार कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय ऊसतोड कामगारांच्या समस्या संदर्भात बीड जिल्ह्यातील सामाजिक संस्था प्रतिनिधी, ,ऊसतोड कामगार, मुकादम ,युवक कामगार संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली आहे.
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा. तसेच टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात यावा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची व महिलांच्या आरोग्यांची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली.
बीड शहरात युवा ग्राम कैज व ऊसतोड कामगार कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शिक्षण हमी कार्ड देण्यात यावे ऊसतोड कामगारांचे स्थलांतर झाल्या नंतर गावात राहणाऱ्या वृद्धांसाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी. कारखाना स्तरावर मासिक आरोग्य तपासणी लसीकरण करण्यात यावे. ऊसतोड कामगारांना माहिती देणारे ॲप निर्माण करण्यात यावे. ऊसतोड कामगारांच्या प्रत्येक कुटुंबाला आरोग्य किट देण्यात यावी. अशा विविध विषयावर चर्चा होऊन सदरील मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासन व राज्य सरकारला जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी काम करणाऱ्या फोरम च्या वतीने देण्याचे ठरले. यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून युवा ग्रामीण विकास मंडळाचे सर्वेसर्वा एच.पी देशमुख सर्व शिक्षा आंदोलनाचे दत्तामामा बारगजे, ऊसतोड कामगार संघटनेचे जीवन राठोड,ऊसतोड कामगार कृती समितीचे ओमप्रकाश गिरी,बाजीराव ढाकणे, बाजीराव गिरी सामाजिक संस्था प्रतिनिधी रोहिदास रोहिटे,गोवर्धन दराडे, बाबासाहेब कोकाटे, नितीन शिंदे,नेहा माळी, अभिमान खरसडे,विनोद शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेच्या सुरुवातीस संतोष रेपे यांनी ऊसतोड कामगारांच्या धारूर व केस तालुक्यात केलेल्या कामाचा आढावा सर्वांसमोर मांडला ऊसतोड कामगार आणि बालविवाह प्रथा याचे परस्पर नाते कसे आहे बालविवाह थांबवण्यासाठी ऊसतोड कामगारांना सामाजिक योजना व त्यांच्या उपजीविकाच्या प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था संघटने यांनी एकत्रित लढा द्यावा याबाबत माहिती सांगितली.
युवा ग्रामचे प्रमुख एच पी देशमुख यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न व महिला आरोग्याच्या प्रश्नाबाबत सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
दत्ता बारगजे यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी प्राधान्याने प्रयत्न व्हावेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ अंतर्गत कार्यान्वित असलेल्या संत भगवान बाबा वस्तीग्रह योजनेची परिणामकारक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी नेटवर्कच्या माध्यमातून नियमित पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत मांडले.
ओमप्रकाश गिरी या नेटवर्कच्या माध्यमातून सर्व शिक्षा अभियान अंतर्गत चालू असलेले ऊसतोड कामगारां च्या मुलांसाठी चे वस्तीग्रह यांना प्रतिदिन प्रति विद्यार्थी 33 रुपये शासन अनुदान देते परंतु हे अनुदान कमी असल्याकारणाने त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही शासन एकीकडे शिवभोजन थाळी साठी 55 रुपये प्रति व्यक्ती पैसा देते व विद्यार्थ्यांना प्रतिदिन तेहतीस रुपये दिले जातात ही तफावत शासनाने भरून काढावी व ऊसतोड कामगारांच्या मुलांना न्याय द्यावा यासाठी बीड जिल्ह्यातून गावागावातील ऊसतोड कामगारांच्या मुलांचे निवेदन जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व शासनाच्या मंत्री यांना देण्यात यावे यासाठी गावपातळीवर लोकांची संघटन बांधणी करणे गरजेचे आहे त्यासाठी आपण नेटवर्क म्हणून पुढाकार घेऊन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांना भेट घेऊन त्यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्याचे कार्यशाळेत निश्चित करण्यात आले.
प्रकाश काळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यशाळेची सांगता करण्यात आली.