वरोरा :- कृष्ठरोगी आणि उपक्षितांच्या सेवेसाठी आयुष्य वेचलेले ,शांतिदुत,सेवेचा मंत्र देणारे जेष्ठ समाजसेवक पद्मश्री श्रद्देय बाबा आमटे यांचा 13 वा स्मृतिदिन कार्यक्रम आज 9 फेब्रुवारीला त्यांच्या समाधीस्थळी पुष्पांजली वाहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
स्मृतिदिन कार्यक्रमात महारोगी सेवा समितीचे सचिव ,समाजसेवक डॉ.विकास आमटे,सदाशिव ताजने,सुधाकर कडू ,डॉ.विकास पोळ,कवीश्वर काका,बक्षी काका,प्राचार्य सुवास पोतदार,शकील पटेल ,राजेश ताजने,शौकत खान, रोहित फरताडे, यांची उपस्थिती होती.
श्रद्देय बाबा आमटे हे आपल्या जीवनात अखेरपर्यंत सामाजिक कार्यात मग्न होते.त्यांनी 15 आगस्ट 1949 रोजी महाराष्ट्रात तीन आश्रमांची स्थापना केली.त्यांनी याठिकाणी कृष्ठरोग्याना राहण्याची व उपचाराची सोय उपलब्ध केली.त्याच सोबत त्यांना रोजगाराची सोयही उपलब्ध करून दिली.सामाजिक एकता व समभाव निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.जंगली जनावरांच्या कत्तली व तस्करी करण्यापासून रोखण्यात लोकांना प्रेरित केले.त्यांनी
नर्मदा बचाओ आंदोलनातही सहभाग घेतला.त्यांच्या असाधारण समाजसेवेसाठी भारत सरकारने त्यांना 1971 साली पदमश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले .श्रद्देय बाबा आमटे यांचा आज 13 व स्मृतिगंध दिन सोहळा कार्यक्रम आनंदवनात घेण्यात आला.

श्रद्देय बाबा आमटे यांना उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.तसेच लतादिदीं मंगेशकर यांना सुद्धा श्रदांजली वाहण्यात आली.याप्रसंगी समाजसेवक विकास आमटे यांनी 1984 ला
याप्रसंगी बोलतांना समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी मुंबई येथे संगीत रजनी कार्यक्रमात श्रद्देय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांची भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांची झालेली भेट व बाबा आमटे आणि लतादिदीं मंगेशकर परिवार यांच्यात असलेला संबंध याबाबत
माहिती विषद केली.कार्यक्रमाचे संचालन अश्विनी आंधळकर यांनी केले.













