राजुरा :- शहरात मागील एक आठवड्यापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून अनेक शेतात पाणी साचले आहे.सततच्या संततधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहत आहे.त्यामुळे पूर आला असून राजुरा-चंद्रपूर मार्ग बंद झाला आहे.वाहतूक बंद असल्याने अनेक वाहने अडकुन पडले आहे.मागील तीन दिवसांपासून ट्रक च्या चालक व वाचकांची खाण्यापिण्याची गैरसोय होत असल्याने राज उर्फ लडू पाटील यांनी मसालाभात देऊन सामाजिक कार्य केले आहे.
.राजुरा वरून गडचांदूर व तेलंगणा राज्याकडे जाणारे दोन राज्यमार्ग आहे.या दोन्हीही राज्यमार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते.पण मागील एक आठवड्यापासून पावसाचा जोर वाढल्याने नदी नाले तुडुंब भरले आहे.त्यामुळे पूर आला असून वर्धा नदी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे शेकडो वाहने अडकून पडले आहे. तीन दिवसांपासून चालक व वाहकांच्या खाण्यापिण्याची गैरसोय होत आहे.त्यांची भूक भागविण्यासाठी राज पाटील यांनी मसालाभाताचे वाटप केले आहे.त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत अन्नदानाचे कार्य केले आहे.त्यांच्यासोबत अनिकेत लांजेवार, भारत बानकर,सुरज सदाफडे,विनोद शेंडे,किशोर नारलेवर,सुरज कोटरांगे,अरुण कावळे,योगेश नारलेवार यांनी मोलाची मदत केली आहे.













