मुंबई : महाराष्ट्रातील रोजगारासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्वाची घोषणा केली आहे. तसेच रिक्षा टॅक्सीचालकांनादेखील त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे. ईबाईक धोरण महाराष्ट्रात स्वीकारले जाईल. बाईक टॅक्सी महाराष्ट्रात सुरू होईल,अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीय.
महिला सुरक्षेच्यादृष्टीने काही नियमावली बनवण्यात आली आहे. पावसात भिजू नयेत म्हणून ई बाईक आणल्या जातील, असेही ते पुढे म्हणाले. महिला सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी ई बाईक पर्याय आणला जात आहे. असे असले तरी त्यांचे दर काय असतील याबाबत अद्याप ठोस निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आनंदाची बातमी दिलीय. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दहा हजार अनुदान द्यायचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रात 20 हजार रोजगार तयार होतील. 10 हजारांहून अधिक रोजगार निर्मिती मुंबईतच निर्मिती होणार असल्याचे प्रताप सरनाईक म्हणाले.













