
बाभळेश्वर -विद्या विकास पब्लिक स्कूल व नाथाजी पाटील म्हस्के जुनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, प्रजासत्ताक दिनाचे अवचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही विचारांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब म्हस्के यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण, राष्ट्रगीत व राज्यगीताने करण्यात आली. यावेळी भारताचे संविधान वाचन करण्यात आले, ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला. रावसाहेब म्हस्के म्हणाले, “प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण का साजरा केला जातो या बाबत अनेक विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषणातून सांगितले.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी लोकशाही भारताच्या भूमिमध्ये स्वातंत्र्य, समानता व बंधुत्व या मूलभूत तत्त्वांची रुजवण केली. आंबेडकरांच्या मते लोकशाही ही केवळ एक सरकारची रचना नसून, ती एक समाजाची रचना आहे जिथे वर्गविहीन समाजाची कल्पना आहे व व्यक्ती व समूहांमध्ये हितांच्या परस्परतेची भावना असते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या महत्त्वाबद्दल विविध भाषांमध्ये भाषणे दिली. रावसाहेब म्हस्के म्हणाले, “आजचा हा दिवस म्हणजे थोर नेत्यांचे समरण व त्यांचे उतराई होण्याच्या दृष्टीने साजरा करत असतो. आपला भारत देश प्रगती करत आहे व जगाच्या पाठीवर आपला देश सर्वांगिनी प्रगती करून पुढे जात असताना आपणही आपले कर्तव्य उत्तम करत असताना आपल्या कुटूंबातील एक आदर्श घटक बनन्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील रहाण्याची गरज आहे.”
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाही विचारांना गौरवण्यात आले व त्यांच्या योगदानाचा अभिमान व्यक्त करण्यात आला. हा दिवस भारतीय नागरिकांना त्यांच्या कर्तव्याबद्दल आणि देशाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची प्रेरणा देतो.
या कार्यक्रमाचे वेळी नामदेवकाका म्हस्के, साहेबराव शिंदे, अण्णासाहेब म्हस्के, भागवतराव कडू, भोकनळ पाटील, राजेंद्र म्हस्के, राजेंद्र घोगरे, रावसाहेब कांदाळकर, चौधरी साहेब, उंडे साहेब, पत्रकार श्रीकांत मापारी तसेच पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.












