मूल प्रतिनिधी:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर विधानसभेत जनसंपर्काचा वेग वाढत आहे. मुल तालुक्यातील टेकाडी आणि चीतेगाव या गावांमध्ये शिवसेनेच्या भगवा सप्ताहानिमित्त गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आलेल्या गिऱ्हे यांचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले. संदीप गिऱ्हे हे सतत जनतेच्या मदतीला धावून जाणारे हक्काचे नेते म्हणून ओळखले जातात, आणि त्यांच्या या प्रतिमेमुळे त्यांना मुल तालुक्यातील जनतेची मोठी पसंती मिळत आहे.
गिऱ्हे यांनी अल्पावधीतच विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर काम करत, बेरोजगारी, शेती, व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना सर्व स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. जनसेवा हा आपल्या राजकीय कार्याचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे, आणि त्यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या तत्त्वाने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
टेकाडी येथील ग्रामस्थांनी दिलेल्या उदंड प्रतिसादावर समाधान व्यक्त करत, “मी राजकारणात असलो किंवा नसलो, तरी तुमच्या सुखदुःखात सदैव तुमच्या पाठीशी उभा राहीन,” असा विश्वास संदीप गिऱ्हे यांनी गावकऱ्यांना दिला.
या कार्यक्रमात तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राजू ठाकरे, महेश चौधरी, सूनिल काळे, ओमदास मोहुर्ले, बादल करपे तसेच टेकाडी आणि चीतेगाव येथील अनेक नागरिक उपस्थित होते.