धामणगाव रेल्वे: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली, धामणगाव रेल्वे मतदारसंघात पक्षाची सक्रिय वाटचाल सुरू आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच अतिक्रमण धारकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी रिपाई आठवले पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्यासोबत उभा राहणार असल्याचे अमरावती जिल्हा संघटक प्रशांत मुन यांनी जाहीर केले.
सोमवारी धामणगाव रेल्वे तहसील कार्यालयावर अतिक्रमण धारकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अतिक्रमण धारकांना २०११ च्या सरकारी नियमांनुसार आठ अ व घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
धरणे आंदोलनात धिरज भैसारे (युवक आघाडी शहर अध्यक्ष), राजिक बेग (अल्पसंख्याक अध्यक्ष), डॉ. पवन झटाले (शहर अध्यक्ष), स्नेहल वानखडे, कु. संजिवनी पचारे, आकाश मुन, आणि मनिष शेलारे यांनी आपली भूमिका मांडली.
आंदोलनाचे सूत्रसंचालन रवि उर्फ दादू मेश्राम (तालुका संघटक, रिपाई आठवले) यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष विनायक ढाणके यांनी केले. या आंदोलनात प्रमुख उपस्थितांमध्ये राजु सावध, आदित्य शंभरकर, दिनेश बोबडे, रंजना रोकडे, अंकुश भैसारे, प्रविण भैसारे, सुनिता भैसारे, मुन्ना खान, सुल्तानखा, सदानंद कांबळे यांच्यासह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश होता.