मारेगाव (यवतमाळ ): स्थानिक मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये सततच्या पावसाने चिखल तर रस्त्यावर पाणी साचून असल्याने गेल्या पंढरवाड्यात घराच्या बाहेर निघणे कठीण झाले आहे. येथिल नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला निवेदन देऊन सुद्धा यावर तोडगा निघाला नाही पण तात्पुरत्या स्वरूपातील मुरूम सुद्धा टाकला नाही. जेणेकरून सध्या येजा करता येईल एवढी सुद्धा व्यवस्था करता आली नाही. हा प्रशासनाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या अंगलट येत आहे. सामान्य जनतेचा काळजीवाहू वाली कुणीच नाही का. असा आता प्रश्न उपस्थित होत आहे. मारेगाव येथिल प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मध्ये येत असलेली वसाहत मंगलम पार्क यात विकास आलाच नसल्याची बाब समोर आली आहे. प्राथमिक सोयीसुविधा सुद्धा पुरविल्या गेल्या नाही. रस्त्याने येजा करणे म्हणचे चंद्रावर पाऊल टाकल्याचा अनुभव येथिल निवासितांना येत आहे. दुचाकीने येथे येजा करतांना महिला पुरुषांनी जमिनीशी घट्ट मैत्री असल्याची अनुभुती दर्शनीय ठरली परंतु अनेकांना इजा सुद्धा झाल्यात.इथे सदनिका बांधून चुक झाली आहे असे अनेकांच्या मनात कोरल्या गेले आहे.या वर्षीच्या मान्सून धारेत स्वतःच्या घरून बाहेर कसे निघावे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे .येथिल विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शाळेत जाता येत नाही आहे , शेतकरी शेताच्या बांधावर जाता येत नाही, व्यावसायिक आपल्या प्रतिष्ठानात जाऊ शकत नाही , पिण्याचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावरून आणता येत नाही.आरोग्य एरणी वर टांगल्या गेले. या वेळी नागरिकांना वेदनादाई त्रास सहन करावा लागत आहे.
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाच आणि सहा मध्ये येत असलेली वसाहत मंगलम पार्क नगरपंचायतला हस्तान्तरीत झाली. परंतु विकास कोसोदूर राहिला आहे. येथिल नगरसेवक या ठिकाणी कधी फिरकलेच नाहीत. त्यामुळे विकासाच्या वाटाच बंद झाल्या असे येथिल नागरिकांना वाटत आहे.स्वतःच्या प्रभागातील जनतेची सेवा करण्याचा जबाबदार प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक होय. लोकशाही पद्धतीने जनतेने आपल्यावर विश्वास संपादन केला याचे ऋण फेडावे असे वाटत नसेल तर जनतेने आपली समस्या कुठून सोडवावी हा प्रश्न उपस्थित होत आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र साजरा करीत असतांना येथिल नागरिक हालअपेष्टा भोगत आहे.