नागभीड :- तालुक्यातील बोन्ड ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या नवानगर येथील शेतकरी महिला जनाबाई जनार्धन बागडे (वय 47)हिला वाघाने तारीख २४ जुलैला सायंकाळी ठार केले.
सदर महिला दिवसभर आपल्या शेतात काम करीत होती. घरी परतीच्या वेळेस दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून दुरपर्यंत नेले.घरी परत आली नसल्यामुळे खुप वेळ वाट बघितल्यावर तिच्या पतीने काही नागरिकांना धरून शोधाशोध केली. जनाबाई शेतावरून घरी परत आली नाही अशी गावात सर्वत्र वार्ता पसरली.आधीच वाघाच्या दहशतीत असलेल्या नागरिकांनी वाघाने काहीतरी गडबड केली असावी असा असा अंदाज लावून तिची जंगलात शोधाशोध केली मात्र रात्री 11वाजेपर्यंत सापडली नाही. नागभीड पोलीस स्टेशनं चे पोलीस निरीक्षक विजय राठोड आपल्या ताफ्यांसाह, व वनविभागाचे कर्मचारी यांनी नागरिकांसह शोधाशोध केली आज सकाळी पुन्हा तिचा शोध घेतल्यावर तिचे शव जंगलात मिळाले. उत्तरीय तपासणीनंतर स्थानिक स्मशान भूमीत तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तिच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.एक दिवस आधी जवळच असलेल्या मिंडाळा येथेही शेतात काम करीत असलेल्या दोडकू शेंदरे (वय 70वर्ष )शेतकऱ्याला ठार केले. लागोपाठ दोन दिवसात दोन शेतकऱ्यांना वाघाने ठार केल्याने शेतकऱ्यांत व परिसरात भीतीचे वातावरण आहे.त्यामुळे रोवायला जाणाऱ्या स्त्री पुरुषांनी शेतीचे कामे करताना सावध राहून काम करण्याची आणि अंधार पडायच्या आत लवकर घरी परत येण्याची वेळ आली आहे.