गोंडपिपरी :–पगार घेणारे नौकर असून मालकाची भूमिका पार पाडत जनसामान्याचे जीवन जगणे कठीण केले आहे.
आदिवासी बुहुल, नैसर्गिक शेती, उद्योग विरहित गोंडपिपरी तालुक्यात शेतकरी, युवक, बेरोजगार यांची पिढवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय, विज,वन्य प्राण्यांपासून शेतपिकांसह मानव जीवाला धोका अशात शासनाचे कर्मचाऱ्यांची वागणूक गुंडशाही पद्धतीची असून खुर्ची गरम करण्याची असल्याने आक्रोश मोर्चातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शेकडोंच्या संख्येने उपस्थित जनसामान्य नागरिकांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले असून जनसामान्याची लूट करणाऱ्यांना धडा शिकवू असा इशारा भूषण फुसे यांनी जन आक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून प्रशासनाला दिला.
गोंडपिपरी तालुक्यातील विविध विभागांच्या कार्यालयांवर जुनआक्रोश मोर्चा धडकला. अनेकांनी यात सहभाग घेतला धाबा येथील वनविभाग कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करीत वनविभागाचे लक्ष वेधले. वन्य प्राण्यांपासून शेतपिकांसह जीवाला धोका त्यामुळे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त तथा शेत उपयोगी लाकडांसाठी वनविभागाचे सहकार्य अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. डुकरांपासून जीव गेलेल्यांना मदत व शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या वनरक्षकांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याची मागणी पुन्हा आक्रोश मोर्चातून पुढे आली.
गोंडपिपरी येथील महावितरण विभागात वीज बिलांची होळी करीत जनसामान्य ग्राहकांना होणाऱ्या त्रासापासून त्वरित सुटका व्हावी अन्यथा कायदेशीर धडा शिकवू असा इशारा भूषण फुसे यांनी जन आक्रोश मोर्चात दिला. मीटर येण्याअगोदर शेतकऱ्यांच्या हातात हजारांचे बिल थोपवले जाते. घरकुलधारकांना 2000 हून अधिक वीजबिल दरमहा भरावा लागतो. जनसमान्यांची पिळवणूक बंद करा अन्यथा राजीनामा द्या असा इशारा महावितरण कर्मचाऱ्यांना मोर्चातून देण्यात आला.
भर पावसात असंख्य शेतकरी, मजूर, बेरोजगार आपल्या हक्क–अधिकारासाठी जन आक्रोश मोर्चा सामील झाले. तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांना घेऊन भूषण भुसे यांनी प्रशासनाला जागे केले. महाराष्ट्र सरकारच्या फसव्या योजना जनसामान्यांना त्रासदायक असून येणाऱ्या निवडणुकीसाठी लॉलीपॉप असल्याचे सांगितले. दीड हजार महिना देणाऱ्या लाडकी बहीण योजनेत जनसामान्यांची लूट सुरू आहे. आरोग्य, शिक्षण, सिंचन यापासून गोंडपिपरी तालुका वंचित आहे. तालुक्यात बस सेवा नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय नाही. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय नाही. अशा विविध मागण्यांना घेऊन कार्यालयासमोर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला व निवेदनाद्वारे तहसीलदार शुभम बहाकर यांना कळविण्यात आले.
यावेळी “अबकी बार गोंडपीपरी के आमदार” अशी घोषणा करण्यात आली. या जन आक्रोश मोर्चाचे नेतृत्व भूषण फुसे यांनी केले यावेळी तुकेश वानोडे, दिपक पेंदोर,प्रदीप कुळमेथे, शंकर पाल, भगिरत वाकडे सह असंख्य शेतकरी, युवक, बेरोजगार उपस्थित होते.