मूल प्रतिनिधी/ रोहित कामडे
मूल तालूक्यात मुसळधार पावसामुळे पुरसद्श्य स्थिती निर्माण होवून अनेक गांवाचा संपर्क तुटला.अनेक प्रवाशाना आपल्या स्वगावी किंवा कामासाठी निघालेल्या नागरीकांना ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीच थांबावे लागले. मार्ग चालू होईल हया आशेवर सकाळ पासून व्याकुळतेने वाट बघत होते. सततच्या पावसामुळे पाण्यांचा ओघ वाढत जावून कोणताही मार्ग प्रवासा करिता खुला झाला नाही. त्यामूळे, लहाण मुले ,वयोवृध्द,महिला,शेतकरी बंधू उपासीपोटी मूल येथे बस स्थानकावर ताटकळत असल्याचे बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांचे निदर्शनास आले. त्यांनी सामाजीकतेची जाणीव ठेवून सर्व प्रवाशाना तुमच्या निवासाची व जेवणाची सोय करण्यांत येईल व तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही असे आश्वासीत केले.
राकेश रत्नावार हे नेहमी सामाजीक कार्यात अग्रेसर राहून जेव्हा जेव्हा संकटे ओढावतात तेव्हा तेव्हा मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न करतात. मूल बस स्थानकावर थांबलेल्या नागरीकाना व एस.टी.कर्मचारी यांना तात्काळ जेवनाची सोय उपलब्ध करून दिली.
याकरिता बाजार समितीचे उपसभापतीराजेंद्र कन्नमवार,बाजार समितीचे संचालक अमोल बच्चुवार, गुरूदास चौधरी, नरेश बोम्मनवार,आशीष दहिवले, समितीचे कर्मचारी प्रविण चेपुरवार,सहा.सचिव,राजु गेडाम,पर्यवेक्षक,.बबलू सैय्यद,मंगेश खानोरकर,सामाजीक कार्यकर्ते विवेक मुत्यालवार,रूपेश मारकवार,रंजीत आकूलवार,संदिप मोहबे, गौतम जिवने , पठाण ,एस.टी.महामंडळाचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.