पुलगाव :- येथील युवा वकील ॲड अक्षय रंगारी (वय ३१) याचे काल दिनांक २७ मे ला सेवाग्राम रेल्वे स्थानकावर अपघाती निधन झाले. अक्षय वर्धा, नागपूर येथे वकिलीचा व्यवसाय करत होता. काल दि.२७ ला धावपळीत तो चुकीच्या रेल्वे गाडीत चढला. चुक लक्षात येताच तो उतरण्याच्या धडपडीत गाडीखाली आला व त्याला जीव गमवावा लागला. ही घटना दुपारी ४ ते ५ च्या दरम्यानची आहे.अक्षय येथील हिंगणघाट फैल परिसरात राहतो. तो काही वर्षांपासून सामाजिक चळवळीत कार्य करीत होता. अक्षयच्या अपघाती निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दि.२८ ला स्थानिय पंचधारा घाटावर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.