वरोरा :- संगणक व मोबाईलमुळे मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आपल्या पारंपारिक खेळांमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहू शकते. मात्र, हे खेळ आता कुणी खेळत नसल्याने ते लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. या खेळांविषयी विद्यार्थी व युवकांमध्ये गोडी निर्माण करून मैदानी खेळ वाचविणे काळजी गरज असल्याचे मत रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले .
ते वरोरा तालुक्यातील शिव सेवा ग्रामीण विकास मंडळ , आबमक्ता द्वाराआयोजित भव्य कबड्डी सामन्यांच्या उदघाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना बोलत होते . या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे , अध्यक्ष म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर , माजी नगराध्यक्ष न .प वरोरा अहेतेशाम अली , भाजप युवा मोर्चा राज्य सचिव करण देवतळे, आब मक्ता येथील ग्रामपंचायत सदस्य . .सपना चायकाटे , उपसरपंच पितांबर मेश्राम , ग्रामपंचायत सदस्य रघु खापणे, सिंधूताई खाडे, यादवराव पेचे , पोलीस पाटील नत्थू मस्की , तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रभान बडवाईक , सामाजैक कार्यकर्ते प्रशांत खाडे , बिट्टू महाकुलकर व खेडाळु तथा आबमकता येथील ग्रामस्थ उपस्थित होते . पुढे बोलतांना स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चंद्रपूर तर्फे मैदानी खेळ वाचविण्याच्या दृष्टीने पाहुणे उचलली गेली असून संस्थेच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रासाठी माजी आमदार कै. म . ना पावडे यांच्या नावाने विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात असून विविध स्पर्धांना मदत हि केल्या जात आहे . तसेच श्रध्येय बाबा आमटे आरोग्य अभियान अंतर्गत निशुल्क कोविद केअर सेंटर , भव्य आरोग्य तपासणी शिबीर , रुग्ण उपचारसेवा मदतकार्य , कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक सहकार्य , दिव्यांगांना निशुल्क सायकल वाटप अशा विविध योजना राबविल्या जात आहे तसेच अनाथांची आई सिंधुताई सपकाळ शेक्षणिक दत्तक योजने अंतर्गत आत्महत्या ग्रस्त , गरीब , गरजू शेतकरी – शेतमजूर कुटुंबातील व निराधार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च , कोरोनाने मृत , आत्म्ग्रस्त , गरीब , गरजू शेतकरी – शेतमजूर कुटुंबातील मुलं मुलींच्या लग्नाचा खर्च हि या योजने अंतरंग केल्या जात आहे . एवढेच काय तर विदेही सदगुरू श्री . संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन कार्यक्रम योजनेअंतर्गत गावा गावात प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन व कार्यक्रमाकरीता मदत करीत आहोत . जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत घेऊन मी सामाजिक कार्यात उतरलो असून आपल्या सेवेसाठी सैदव्य तत्पर आहे.