अधिकाऱ्यांवर मनुष्वधाचा गुन्हा दाखल करा : कुटुंबीयांची मागणी
गोंडपिपरी-(सुरज माडुरवार):-गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर (चेकबापूर) येथील शेतकऱ्याचा जिवंत विद्युत ताराच्या स्पर्शामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दि.१६ शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.
राजेश्वर मोतीराम तोहगावकर वय (५५) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.गेल्या दीड दोन महिन्यापासून वादळामुळे सकमुरात शेतातील काही विद्युत खांब कोसळले होते.त्याची तक्रार व माहिती शेतकऱ्यांनी महावितरण विभागाला दिली.त्यांनी विद्युत पुरवठा खंडीत केला पण दोन महिने लोटूनदेखील खांब उभे केले नाही तुटलेल्या तारांची विल्हेवाट लावली नाही.रोज प्रमाणे राजेश्वर आपल्या शेतात त्या तारांवरून जात होता अचानक त्याला करंट लागला त्यानंतर तो तारावरच कोसळला शरीराला जिथे तार स्पर्श झाले त्या ठिकाणी जखम झाली असून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.आपल्या कर्तव्यात निष्काळजी करणाऱ्या महावितरण च्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कडवं कारवाई करावी सोबत कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी ग्राम पंचायत सदस्य अशोक रेचनकर यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे.महावितरण चे अधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय प्रेत उचलणार नाही अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे.राजेश्वर तोहगावकर यांच्या पच्यात दोन मुले, पत्नी असून तोहगावकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे