भद्रावती : “जगातली भांडण मिटवायची असेल तर आपण विश्वधर्म ही भावना पाळली पाहिजे. इतर धर्माचा आदर केला पाहिजे असे विवेकानंदांना वाटत” असे विचार चंद्रपूर येथील साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. शाम मोहरकर यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती निमित्त मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून
विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट), वरोरा या शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी तथा प्रसिद्ध उद्योजक रमेश राजूरकर, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, सचिव माधव कवरासे , प्रा.धनराज आस्वले, डॉ.बंडू जांभुळकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.मोहरकर यांनी सांगितले की, “तरुणांनी निर्भयपणा व शूरपणा बाळगायला पाहिजे असे विवेकानंदांना वाटत. जो घाबरतो तो जगात काहीच करू शकत. जो डर गया वो मर गया” असे वातावरण आहे. यावेळी रमेश राजुरकर, प्रा.धनराज आस्वले यांचीही प्रासंगिक भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन डॉ.ज्योती राखुंडे, प्रास्ताविक बंडू जांभुळकर, आभारप्रदर्शन डॉ. जयवंत काकडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पालक, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक मित्र मंडळाचे पदाधिकारी तथा सदस्य, शहरातील नागरिक, प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी- विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.