राजुरा:- मुख्यालयापासून दोन किमी अंतरावर असलेल्या आर्वी या गावातील घनश्याम मालेकर हा मागील दहा वर्षांपासून गायन व भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करीत आहे.त्याला गावातील ५ ते ६ सहकाऱ्यांची साथ मिळत आहे.
.घनश्याम चिमना मालेकर यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कलापथकाची स्थापना करून परिसरातील गावात जनजागृतीचे काम करीत आहे. राज्य शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन जनतेला प्रबोधन करीत आहे.दारूबंदी, स्वच्छता अभियान, हागणदारीमुक्त, लोकसंख्या निर्मूलन आदी विषयांवर गायन,कीर्तन व भजनाच्या माध्यमातून जनतेला जागृत करण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत त्यांनी खमोना,बोडगाव,रामपूर,राजुरा, अहेरी,कापणगाव आदी गावात त्यांनी कार्यक्रम घेतले आहे.त्यांच्या या सामाजिक कार्यात भाऊराव चोथले, मोरेश्वर मालेकर,दौलत तोडसे,सुधाकर मायकुलकर,महेश चोथले यांची साथ मिळत आहे.