गोविंद चक्रवर्ती /भामरागड :-भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीवर भव्य पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाल्याने येथील नागरिकांना जिल्हा मुख्यालयाशी संपर्क साधण्यात मोठी सुविधा झाली आहे. मात्र, या पुलाच्या बांधकामामुळे याठिकाणी जवळपास 40 ते 50 वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना आपला सर्वस्व गमवावा लागला आहे.
भामरागड येथील पर्लकोटा नदीला दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या स्वरूपाचा पुर येत असल्याने येथील नागरिकांच्या जिल्हा मुख्यालयाशी दरवर्षी संपर्क तुटून येथील पूर्ण दळणवळणाचे सोय पूर्णपणे बंद होत होता त्यामुळे याठिकाणी भव्य आणि मोठ्या स्वरूपाचा पूल तयार व्हावी अशी मागणी येथील नागरिकांची होती.जेनेकरून तालुक्यातील 128 गावातील नागरिकांच्या वाहतुकीच्या समस्या कायम दुर व्हावी आणि ही अपेक्षा फक्त 128 गावातील नागरिकांचीच नव्हे तर येथील व्यापाऱ्यांनीही हा विषय आपल्या उराशी बाळगून नेहमी शासन दरबारी पाठपुरावा करत राहले अनेकदा या व्यापाऱ्यांनी आपल्या स्वखर्चाने पूर्ण व्यापारपेठ बंद ठेवून जिल्हा कचेरीत गाठून त्याठिकाणी येल्गार केला, शासनाला विनंती केली मात्र या पुलाच्या बांधकामामुळे आपण अगदी रस्त्यावर येणार आणि आपल्या तोंडाचा घास हिरावून घेऊन आपल्याला उघड्यावर पाडला जाईल याची कल्पना मात्र कदाचित येथील व्यापाऱ्यांना नव्हती आणि तसं झाला तर शासन व प्रशासन आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही आपल्या हिताच्या काहीतरी निर्णय घेतीलच आणि आपल्याला न्याय देतील अशी अपेक्षा येथील प्रत्येक व्यापाऱ्यांच्या मानात होती.मात्र पुलाच्या बांधकाम, सर्व्हिस रस्ता, अतिक्रमण अश्या पद्धतीच्या सर्व विषयावर शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातं आहे यात एकच घटक सुटला असेल तर तो म्हणजे फक्त व्यापारी वर्ग यामध्ये व्यापाऱ्यांचा विषयचा कुठेही उल्लेख नाही.
आजपर्यंत तालुक्यातील 128 गावातील नागरिकांच्या सर्व साहित्यरूपी अडचणीं दुर करत राहिलो त्यांच्या मागणीनुरूप सर्व साहित्य पुरवठा करून त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना सोय सुविधा पुरवित राहलो आणि आज मात्र आपण स्वतच मोहताज झालो आहे.आत्ता नुकताच 30 एप्रिल 2026 रोजी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, गडचिरोली यांनी एक नोटीस निर्गमित केली आहे, ज्यात व्यापाऱ्यांना अतिक्रमण मोडकळीस आण्यास सांगितले आहे. नाहीतर शासनाकडून पाडकाम करण्यात येईल आणि त्याचा खर्च व्यापाऱ्यांकडून वसूल केला जाईल.भामरागड तालुक्यातील सर्व नागरिक येथील सर्वसामान्य ते अधिकारी व कर्मचारी यांच्या सर्वांच्या गरजा भागविणाऱ्या व्यापारी वर्गांच्या पाठीशी आज कोनीच नाहीत उरला आहे तर फक्त या प्रदीर्घ काळाच्या आठवणी.एखाद्या रोपट्याला आपण खतपाणी घालून त्याला मोठा करायचा आणि मोठा झाल्यावर त्याला आपणच आपल्या हाताने संपवायचा हे शक्य तरी आहे का? शासन आणि प्रशासनाच्या धाकेने येथील व्यापारी आपल्या स्वतच्या कठोर मेहनतीने तयार केलेल्या वास्तूला खूप जड अंतकरणाने आपल्या स्वतच्यास हाताने तोडण्यास सुरुवात केली आहे.कोणी जर सहा महिने एखाद्या भाड्याचा इमारतीत राहायला गेले तर त्याला त्या भाड्याचा खोलीवर प्रेम होऊन जाते मात्र ज्याठिकाणी दुकान थाटून जवळपास दोन पिढेने व्यवसाय केला त्या ठिकाणाला सोडताना आणि आपल्या स्वतच्या हाताने त्याला संपवितांना त्यांना काय वाटत असेल हे फक्त त्या व्यक्तीलाच माहीती जो याचा पीडित आहे.
पर्लकोटा नदीवर भव्य पूल व्हावी अशी 128 गावातील नागरिकांची मागणी होती मात्र त्या सोबतच या तालुका मुख्यालयात अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या या व्यापाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे हे अशोभनीय आहे. त्यामुळे शासनाने याचे गांभीर्याने विचार करून यांना पर्यायी जागा किंवा यांच्या ज्या मागण्या आहे ते तातडीने पूर्ण करायला पाहिजे.
– लक्ष्मीकांत मालू बोगामी
अध्यक्ष,तालुका काँग्रेस कमिटी,भामरागड तथा सामाजिक कार्यकर्ता,भामरागड.













