पुलगाव – महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील राजकोट येथे ८ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा राज्य सरकारच्या मार्गदर्शनात तयार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. मात्र, अलीकडच्या एका मामुली वाऱ्यामुळे तो पुतळा जमिनीवर पडून खंडित झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. या निषेधाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले.
पुलगाव येथे नगरपालिकेसमोर या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये महायुती सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सावरकर, अध्यक्ष सुनील ब्राम्हणकर, राष्ट्रवादीचे श्यामसुंदर देशमुख, शिवसेनेचे प्रशांत (बाळा) शहागडकर, राजू विरुळकर, मुन्ना शुक्ला, दिलीप वलिवकर, नटवर चौबे, सुरेश गोतमारे, राजेंद्र रवाळे, अश्विन शहा, गोविंद दैया, डॉ. विजय राऊत, विजय भटकर, रमेश शर्मा, बंटी सोनी, मुस्ताक हुसेन, नीरज ढगे, गजानन पचारे, इमरान शेख, डेव्हिड जेकब, करामत भाई, रुपराव राऊत, गौतम गजभिये, किरण मलमकार आदी उपस्थित होते.
या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.