नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या मंत्रिमंडळाचा खातेवाटप जाहीर करण्यात आला असून अमित शाह यांच्याकडे गृहखातं कायम ठेवण्यात आलं आहे. तर शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कृषीमंत्रालयासोबत ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात नितीन गडकरी यांना पुन्हा रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (9 जून) नवीन NDA आघाडी सरकारच्या 71 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. मोदींच्या या तिसऱ्या मंत्रिमंडळात 30 कॅबिनेट मंत्री, पाच जणांकडे स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्री आहेत. मोदी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर भाजपने गृह मंत्रालय, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय स्वतःकडे ठेवल्याचं सपष्ट झालं आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?
अमित शाह- गृहमंत्रालय
राजनाथ सिंह- संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थ मंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम माझी- सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी- महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू- नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा- आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील- जलशक्तीकिरण
रिजीजू- संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान- शिक्षण मंत्री
राज्यमंत्री
श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री