• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home महाराष्ट्

लातूर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप येत्या मे-2022 अखेर होईल या दृष्टीने नियोजन करावे -पालकमंत्री अमित देशमुख

Ashish Ghume by Ashish Ghume
March 18, 2022
in महाराष्ट्
Reading Time: 4 mins read
A A
0
लातूर जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप येत्या मे-2022 अखेर होईल या दृष्टीने नियोजन करावे -पालकमंत्री अमित देशमुख

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Spread the Information

• साखर कारखाने व शासनाच्या कृषी विभागाने एकत्रित सर्वे करून एकूण शिल्लक

ऊसाची माहिती संकलित करावी.

• ऊस गाळप होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून

एकमेकांना सहकार्य करावे

• ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने त्यांच्याशी

संपर्क साधून उपाय योजना आखाव्यात.

• अधिक दिवस साखर कारखाने चालवताना येणाऱ्या अडचणीची माहिती लेखी

स्वरूपात कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडे सादर करावी.

• सोलापूर जिल्हाधिकारी यांना संपर्क करून तेथील साखर कारखान्यामार्फत लातूर,

उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे गाळप होईल या पद्धतीचे नियोजन करावे

• मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित

करून शासनाकडे अहवाल सादर करावा.

• साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान व ऊसतोड मजुरांना प्रोत्साहन अनुदान

देण्याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून मार्गदर्शन घ्यावे.

लातूर:- यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने ऊसाचे एकरी उत्पादन वाढून तोडणी कार्यक्रम लांबला आहे, असे असले तरी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून येत्या मे-2022 अखेरपर्यंत सर्व ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन करावे, नियोजन करित असतांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसाड होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निजी कक्षात आयोजित लातूर जिल्ह्यातील ऊस गाळप आढावा बैठकीत ते बोलत होते.
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील आता पर्यंतचे ऊसाचे गाळप तसेच शिल्लक ऊस परिस्थितीचा आढावा श्री. देशमुख यांनी घेतला.
या बैठकीस लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख, नॅचरल शुगर लि.चे चेअरमन बी.बी.ठोबरे, साई शुगरचे चेअरमन राजेश्वर बुके, रेणाचे कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, संत शिरोमणी मारूती महाराज साखर कारखाना चेअरमन गणपतराव बाजुळगे, विभागीय सहनिबंधक (साखर) बी.एल.वागे, जिल्हा उपनिबंधक समृध्द जाधव, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखानाचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा सहकारी साखर कारखाना व्हा. चेअरमन अनंतराव देशमुख, व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, टवेन्टिवन शुगर लि.चे व्हा.चेअरमन विजय देशमुख तसेच जिल्ह्यातील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत बोलतांना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी गळीत हंगामाच्या या पूढील कालावधी देखील कारखाने अधिकाधिक कार्यक्षमतेने चालवून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे मे अखेर पर्यंत गाळप होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले.
या ऊसाचे सर्व कारखान्यांना नियोजनपूर्वक गाळप करता यावे, यासाठी साखर कारखान्यांनी आणि शासनाच्या कृषी विभागाने शिल्लक असलेल्या ऊसाचा एकत्रित सर्वे करून एकूण शिल्लक ऊसाची माहिती संकलित करावी. ही माहिती अद्ययावत झाल्यानंतर जास्तीत – जास्त ऊस गाळप होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून एकमेकांना सहकार्य करावे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही, यादृष्टीने प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधून उपाय योजना आखाव्यात.
अधिक दिवस साखर कारखाने चालवताना येणाऱ्या अडचणींची माहिती लेखी स्वरूपात कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडे सादर करावी , म्हणजे शासन पातळीवरून आवश्यक ती मदत मिळण्यासाठी पाठपूरावा केला जाईल.
शेजारी जिल्ह्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे, या कारखान्यांना आवश्यक ते सहकार्य करून ऊस घेऊन जाण्यासाठी विनंती करावी. सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करून तेथील साखर कारखान्यातून मार्फत लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे गाळप होईल या पद्धतीचे नियोजन करावे.
मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करावा. जास्तीचे दिवस साखर कारखाना चालवल्यानंतर साखर कारखाना होणाऱ्या नुकसानीबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून माहिती घेऊन शासनाकडे सादर करावी. ही माहिती मिळाल्यानंतर साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान आणि ऊसतोड मजुरांना प्रोत्साहन अनुदानदेण्याबाबत वसंतदादा शुगर इन्सट्यूटकडून मार्गदर्शन घ्यावे, आदी सुचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी या बैठकीत दिल्या.
प्रारंभी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी जिल्ह्यातील एकूण ऊस परिस्थितीचा आढावा सादर केला. त्यानंतर साखर कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाकडून त्यांच्या कारखान्यातील गाळपाची माहिती देण्यात आली. संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी नॅचरल शुगरचे चेअरमन बी.बी.ठोबरे, साई शुगरचे राजेश्वर बुके यांनी तसेच कार्यकारी संचालक, शेतकी अधिकारी यांनी ऊस गाळपाबाबतच्या सुचना यावेळी मांडल्या.
Previous Post

लातूर महानगरपालिका महिलांसाठी मोफत बस सेवा पुरविणारी देशातली पहिली महापालिका ठरली ; लातूर सर्व आघाड्यावर पुढे राहिल असे, प्रयत्न करु या – पालकमंत्री अमित देशमुख

Next Post

जाणीव फाउंडेशनच्या वतीने श्रीनाथ वृध्दाश्रमला जीवनावश्यक वस्तुचे वाटप

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
जाणीव फाउंडेशनच्या वतीने श्रीनाथ वृध्दाश्रमला जीवनावश्यक वस्तुचे वाटप

जाणीव फाउंडेशनच्या वतीने श्रीनाथ वृध्दाश्रमला जीवनावश्यक वस्तुचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1