भामरागड :तालुका मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना आपला घरदार सोडून बाहेर पडावा लागला.अशात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेकांचे मदतीचे हात पुढे आल्याचे दिसून आले.
भामरागड तालुका मुख्यालयात पर्लकोटा, पामुलगौतम आणि इंद्रावती असे बारमाही वाहणारे तीन नद्या आहेत. रविवारी 8 सप्टेंबर पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या तिन्ही नद्यांना पूर आला. पुराचा पाणी शहरात शिरल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागला. यातील बरेच कुटुंब इतरांच्या घरी आश्रय घेतले आहे. घरदार सोडून आलेल्या कुटुंबीयांना प्रशासनाने तर मदत केली.मात्र,या सामाजिक कार्यात अनेकांनी मदतीचे हात समोर केले आहे.
त्यात राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार यांनी जवळपास 70 नागरिकांना अन्नदान केले व नगराध्यक्ष न. पं. भामरागड रामबाई महाका यांनी 50 नारिकांना अन्नदान केले तर मुख्याधिकारी न. पं. भामरागड अभिजित सोनवने यांनी पूर बाधितांना चहा व बिस्कीट पुरविले.
सध्या हळूहळू पूर ओसरत असल्याने पूर बांधतानी आपल्या निवाऱ्याचे साफसफाई करून परत आपले जनजीवन पूर्ववत रुळावर अनण्याचा तयारीत लागले असले तरी संकट काळात मदत करण्यासाठी भामरागड तालुका मुख्यालयातील अनेकांनी मदतीचे हात पुढे केल्याने सामाजिक एकोपा असल्याचे दिसून आले.