अहेरी:७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ३७ बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत काढलेल्या मोटरसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले. ही रॅली ३७ बटालियनचे कमांडंट श्री दव इंजीरकन किन्डो यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.
घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत ३७ बटालियन मुख्यालय प्राणहिता कॅम्प ते आलापल्ली आणि आलापल्ली ते अहेरी पर्यंत ‘भारत माता की जय’ चा नारा देत मोटार सायकलवरून तिरंगा रॅली काढण्यात आली. तिरंगा मोटार सायकल रॅलीमध्ये ३७ बटालियनचे सर्व अधिकारी, अधिनस्त अधिकारी, जवान, जवानांचे कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी दुपारी १२ ते ०३ या वेळेत मोटारसायकलवर स्वार होऊन ३७ बटालियनच्या मुख्यालयातून आलापल्ली,नागेपल्ली आणि अहेरी वरून परत कॅम्पवर पोहोचले.
राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्यासाठी घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा मोटार सायकल रॅली काढण्यात आली.या रॅलीत गावकऱ्यांनीही उत्साहाने सहभाग होऊन ठिकठिकाणी जवानांसोबत सेल्फी आणि व्हिडिओ करत ‘भारत माता की जय’चा जयघोष देत परिसर दणाणून सोडला.