गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यात रविवार पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडसह आता मुलचेरा तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला.
गडचिरोली जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वदूर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आज पहाटे भामरागड तालुक्याचा तिला मुख्यालयाशी संपर्क तुटला. त्यानंतर मुलचेरा तालुक्यात देखील दीना नदी आणि चाची नाल्याविल पुल पाण्याखाली गेला असून आता भामरागड पाठोपाठ मुलचिरा तालुक्याचा देखील संपर्क तुटला.दोन्ही मार्गावर रहदारी ठप्प झाली आहे.
फिश म्हणजे जिल्ह्याचा दक्षिण भागात पावसाचा कहर केला असून भामरागड तालुक्यात १६४.५ मीमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. नंतर अहेरी ६९.५, एटापल्ली६९.२, सिरोंचा ४८.००,धानोरा ४४.६,गडचिरोली ४२.८,मुलचेरा ४३.००,आरमोरी ३२.००, कोरची,चामोर्शी २०.०० १.०७,देसाईगंज १५.५,कुरखेडा १५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अजूनही काही भागात पाऊस सुरूच आहे हे विशेष.